आदरणीय प्रिय पंतप्रधान मोदीजी ,
काय लिहू तुमच्याबद्दल, वरील आदरणीय अणि प्रिय लिहताना तिथे एक शिवी लिहू वाटत होती, पण काय करणार देशाचे प्रतिनिधी म्हणुन सन्मानाच्या पदावर आपण विराजमान आहात. ज्या पदाचा अपमान करायची माझी अजिबात इच्छा नाही. पण हा लेख लिहिण्या मागचे कारण आहे आज 2 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथील शेतकऱ्यांना तुम्ही दिलेल्या वागणुकीबद्दल
2014 च्या निवडणुकीत मोठ्या ताठ मानेने तुमचा प्राचार करताना माहीत नव्हत तुमच सरकार इतके उलट्या काळजाचे निघेल. मतदानाचा अधिकार नव्हता तरी फक्त देशात सकारात्मक बदल घडतील अशी अपेक्षा ठेऊन मी आपला अणि आपल्या पक्षाचा प्रचार केला एवढच नव्हे माझ्यासारख्या अनेक तरुणांनी आपला प्रचार केला. इतका उद्रेक झाला त्यावेळी की आपण स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नंतर इतक्या वर्षांत बहुमतात सरकार स्थापण्याचे भाग्य मिळवले. लोकांना खूप आश्वासने दिलीत आपण, त्याबद्दल काही आक्षेप नाही. पूर्ण देखील करू शकला नाहीत तरीही एवढे वाईट नाही वाटले, पण आज मात्र वाईट वाटतय. वाईट एवढ्यासाठी वाटतय की ज्या शेतकरी वर्गाने आपल्याला भरभरून प्रतिसाद दिला त्यांना आपण काहीच दिले नाही. अणि जेव्हा त्यांनी शांततेत मोर्चा काढला तर आपन दिल्लीत शेतकर्यांना प्रवेश नाकारला, का हो ते मोर्चेकरी शेतकरी देखील नक्षलवादी वाटले होते का?
अणि तरीही शेतकर्यांनी विरोध केला तर त्या निष्पाप शेतकर्यांना आपण पोलिसांच्या मार्फत लाठीचार्ज केलात, त्यांच्यावर अश्रूधुराचे नळकांडे सोडले. पाण्याचा मारा करून त्यांना माघार घ्यायला लावली. असंख्य शेतकर्यांना रक्तबंबाळ केले. आजवर एवढे राज्यकर्ते आले पण आपल्या इतका हुकुमशाही प्रवृत्तीचा पंतप्रधान देशाला भेटला हे या देशाचे दुर्भाग्य.
आज माझ्यासारख्या असंख्य तरुणाना अणि जनतेला या घटनेबद्दल चीड येते संताप येतो पण तुम्हाला त्याच्याही काहीच कर्तव्य राहिले नाही. कारण तुम्ही आता सगळी यंत्रणा काबीज केलीये ना. सगळ्या महत्त्वाच्या पदावर आपले विश्वासू शिलेदार बसवून आपल्याला हवी तशी देशाची वाट लाऊ शकता आपण.
आज ज्या शेतकरी बांधवांनी मोर्चा काढलेला ते काय सरकला खंडणी नव्हते मागत. ते त्यांच्या हक्काची लढाई लढत होते अणि तुम्ही त्यांच्यावर इतक्या क्रूरपणे पोलिसांकडून हल्ला केलात.
मोठमोठे गुजराती व्यापारी हजारो कोटींचे घोटाळे करून देश सोडून पळून गेलेले बर चालतात हो तुम्हाला. तेव्हा नाही तुम्ही दंडुकेशाही वापरत. तो मद्यसम्राट विजय मल्ल्या सांगून गेला होता तुमच्या एका मंत्र्याला की मी देशाला 15 हजार कोटींचा चुना लाऊन जातोय, पण तिथे नाहीत तुमच्या यंत्रणेचे हात जाणार. तुम्हाला दिसणार आमचा गरीब शेतकरी. अहो गेल्यात चार वर्षात गाय, जात धर्म, नेहरू, गांधी, अणि भूलथापा याशिवाय तुम्ही दिलेच काय लोकांना. आनि तुमच्या विरोधात कुणी आवाज उठवला तर त्याला तुम्ही अश्या प्रकारे जेरीस आणणार.
तुम्ही लोकशाहीच्या चौथ्या खांबाचा म्हणजेच वृत्तपत्रे अणि मीडियाचा गळा घोटला, तुम्ही “ईव्हिएम” मशीन मधे बिघाड करून निवडणुका जिंकल्या, तुम्ही संख्याबळ कमी असताना देखील सरकार स्थापन करण्याची संधी स्वतः प्रथम मिळवून लोकशाहीच्या तत्त्वाची पायमल्ली केली. देशातील लोकशाही अक्षरशः या मोदी नवाच्या हुकूमशहाच्या पायाशी लोळण घालत आहेअक्षरशः
आज आपल्या देशातील अनेक विचारवंत, लेखक, साहित्यिक, पत्रकार यांच्या मनात या सरकार बद्दल रोष आहे, पण ते जाहीरपणे व्यक्त नाहीत करू शकत. कारण आहे सरकारचे दबावतंत्र. ही अघोषित आणीबाणी आज आपल्यावर लादली गेली आहे. जर अजून देखील जनतेचा उद्रेक झाला अणि मोदींना अंदाज आला की आता आपले सरकार येऊ शकत नाही तर आणीबाणी देखील जाहीर करायला मागेपुढे पाहणार नाहीत हे महाशय.
आज अनेक लोकाना यांचे खरे रूप समजले आहे, तसेच असंख्य लोक असेही आहेत की ज्याना अजुनहि या नीच सरकार बद्दल आस्था आहे. पण बाबांनो एक गोष्ट ध्यानात घ्या “एकदा गमावलेल स्वातंत्र्य सहजासहजी परत नाही मिळत” इतिहास आठवा, एकदा इंग्रजानी आल्यावर राज्य आणले तर स्वातंत्र्य मिळवायला 150 वर्षे गेली. शिवरायांच्या काळात तर 350 वर्षे गेली. त्यामुळे हे सहज समजू नका. आज अनेक व्यापाऱ्यांना मोदी यांनी अभय दिले ज्यानी सरकार कडून घेतलेल कर्ज बुडवलेल आहे. ज्यानी कर भरला नाही. पण शेतकर्यांना त्यांच्या मागणीसाठी झुलवत ठेवले
लक्षात ठेवा मोदीजी हा देश पहिला शेतकर्यांचा आहे या देशाचा राजा हा शेतकरीच आहे. व्यापारी उद्योगपती नंतर,पण तुमचे पहिले प्राधान्य हे शेतकर्यांना असायला हवे होते. परंतु दुर्दैव आमच की आम्हाला एक आदर्श पंतप्रधान नाही तर, तुमच्यासारखा संवेदनाहीन अणि देशातील काही चार मोठ्या उद्योगपतींच्या दावणीला बांधलेला बैल पदरात पडलाय. आज अनेक मोदी भक्त त्यांच्यावर वापरलेल्या या भाषेवरून मला उत्तर द्यायला येतील पण त्यांना देखील एकच आवाहन आहे, देशाच्या इतिहासातील इतका खोटारडेपणा असलेला पंतप्रधान मला दुसरा कोणीतरी दाखवा. सतत खोटे बोलणारा हा माणूस देशाच्या सर्वोच्च पदावर पंतप्रधान म्हणुन विराजमान आहे याच्यासारखे दुसरे दुर्दैव नाही.
माझ माझ्या सारख्या असंख्य तरुण मित्रांना मनापासून आवाहन आहे, कृपा करून या सरकार बद्दल असलेला आपला रोष व्यक्त करा. जर व्यक्त करू शकत नसाल तर दुसरा जो करत असेल त्याला पाठींबा द्या. पण या गेंड्याच्या कातडी असलेल्या निर्दयी सरकारच्या विरोधात जा. जर आज आपण हे केले नाही तर येणार्या पुढच्या पिढीला आपण काय तोंड दाखविणार. देशाची लागत असलेली वाट निमुटपणे पाहत असणारी पिढी म्हणुन आपली ओळख होऊ देऊ नका आपल्या पिढीची.
कृषिप्रधान देशात शेतकरी राजाला अशी अमानुष मारहाण होणार असेल तर हे लक्षण देशाच्या विनाशाचे आहे. अनेक मोदी भक्तांना देखील कळकळीची विनंती आहे, मित्रानो एखाद्या व्यक्तीबद्दलचे समर्थन मी देखील समजू शकतो. पण त्या व्यक्तीच्या प्रेमाने इतके आंधळे होऊ नका की काही काळाने, आपला देश आपणच संपवला अणि हुकुमशाही आणली या गोष्टीचा पश्चाताप करावा लागेल. इतके आंधळे नका होऊ मित्रानो. हातातून एकदा हे निसटले की परत काहीच उरणार नाही.
आज मी हा लेख लिहिला कारण मी देखील शेतकरी म्हणुन जगलोय काम केलेय. मला आस्था आहे शेतीबद्दल. आनि याच माझ्या मायबापांना जर सरकार असे हुकुमशाहीने चिरडणार असेल तर मी व्यक्त होणे माझे कर्तव्य समजतो. मित्रांनो या जुलमी सरकार विरोधात एकत्र या, व्यक्त व्हा. व्यक्त होता नाही आले तर जो व्यक्त होतोय त्याला बळ द्या. कारण तो व्यक्त होणारा कुठे ना कुठे तरी तुमच्या वाट्याची लढाई लढत असतो. काहीही करून या हुकूमशहा सरकारला विरोध करा.
मित्रानो सुरुवात जरी मोदींना पत्र लिहतोय अश्या स्वरुपात असली, तरी हा “संताप” आहे शेतकर्यांना मोदी सरकारने आज दिलेल्या वागणुकीबद्दलचा. मला देखील माहित आहे, माझ हे शब्द मोदी पर्यंत नाहीत पोहोचणार. पण मला विश्वास आहे माझ्या या शब्दांमुळे चार लोक तरी या नीच सरकारच्या भूल थापा मधून बाहेर येतील. अणि सत्य परिस्तिथी समजून शहाणे होतील . 2 ऑक्टोबर दिवशी जगाला अहिंसेचा संदेश देणार्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी त्यांना आपण अभिवादन केलेत मोदीजी, अणि त्यानंतर काही वेळातच आपल्याच सरकारने हिंसा केली. त्याबद्दल त्यांना एकच सांगायचे आहे “मुंह मे राम और बगल मे नथुराम ही आपली वृत्ती लोकांनी ओळखली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यां कडुन तर मत मिळण्याची अपेक्षा अजिबात करू नका…..!
जय महाराष्ट्र…!
©Vitthal bhagat